भाई बजरंग ताटे यांना जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्कार जाहीर
कळंब | प्रतिनिधी
भाई बजरंग ताटे यांना संत तुकाराम सामाजिक संस्था बाबळगाव, व संभव प्रतिष्ठान केशेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्कार जाहीर.
भारताचे संविधानातील न्याय ,स्वातंत्र्य ,समानता ,बंधुता ,या मूल्यासाठी धाराशिव जिल्ह्यासह मराठवाड्यातील, घामाने भिजणाऱ्या आणि कष्टाने थकणाऱ्या, ग्रामीण भागातील उपेक्षित, वंचित, पीडित, शोषित सर्वसामान्य जनतेच्या सुख दुःखाच्या प्रसंगी न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, मूल्यांची संजीवनी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य, श्रमिक मानवाधिकार संघ, व महिला अधिकार आंदोलनाच्या माध्यमातून वस्ती, तांडे, गाव पातळीवर कार्य करीत असल्यामुळे संत तुकाराम सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद काळुंखे संभव्य, प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष तुकाराम शिरसागर केशेगाव यांनी भाई बजरंग भाऊ ताटे यांना निवड पत्र देऊन साई मंगल कार्यालय ईटकळ ता.तुळजापूर येथे शनिवार, दि. ०९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०१:०० वाजता जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्कार २०२५ देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे निवड पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे सर्व स्तरातून भाई बजरंग भाऊ ताटे मानव अधिकार रक्षक यांचे अभिनंदन होत आहे.


